मिकू माकडाने सांगितले दुनियादारीचे रहस्य
बोधकथा
टोनू घोडा
आणि घोनू गाढव यांनी शेजारीशेजारीच किराणा मालाचे दुकान उघडले . हळूहळू टोनू
घोड्याचे दुकान चांगलेच चालू लागले ;
पण घोनू
गाढवाचे दुकान ठप्प पडले . यामुळे घोनू गाढवाला खूपच वाईट वाटू लागले . तो दु : खी
राहू लागला . एकदा घोनू गाढव त्याच्या मिकू माकड या मित्राला भेटायला गेला .
- Knowledge increases by eating chocolate / चॉकलेट खाने से बढ़ता है नॉलेज
Amazing facts world in Hindi अमेजिंग फैक्ट वर्ल्ड
Amazing facts life-saving in Hindi / अमेजिंग फैक्ट लाइफ सेविंग
तो त्याला
म्हणाला , ' मित्रा , माझे दुकान चालत नाही याचे कारण
तूच सांग . वास्तविक माझ्या दुकानातील वस्तुंचे भावही टोनू घोड्याच्या दुकानातील
वस्तुएवढेच आहेत .
मी मालही
अगदी व्यवस्थित मापून देत असतो . ते ऐकून मिकू विचारात पडला . खूप विचार
केल्यानंतर तो घोनू गाढवाला म्हणाला , ' घोनू दादा , मी तुझ्या दुकानात बसूनच तुझे दुकान का चालत नाही
याचा शोध घेईन .
सांगितल्याप्रमाणे
मिकू माकड दसऱ्या दिवशी सकाळीच घोनू गाढवाच्या दुकानात येऊन बसले . ते दिवसभर घोनू
गाढवाच्या हालचाली पाहात होते . वरचेवर बाहेर जाऊन टोनू घोड्याच्या दुकानातही
पाहात होते .
संध्याकाळ
झाल्यानंतर तो घोनू गाढवाला म्हणाला , ' आता मी जातो . उद्या पुन्हा येईन .
' दुसऱ्या दिवशी सकाळी मिकू दुकानात
आला . येताच घोनूला म्हणाला , ' यार घोनू , खूप भूक लागली आहे रे .
हरी
पोपटाकडून चार सामोसे तरी आण . पण हो . सामोसे हरी पोपटाकडूनच आण . इतर कोणाकडून
नको . ' घोनू सामोसे आणायला गेला . थोड्या
वेळाने तो सामोसे घेऊन आला . दोघे सामोसे खाऊ लागले .
मिकूने
सामोशाची चव घेतली आणि तो म्हणाला , “ सोनू , तू सामोसे हरी पोपटाकडून आणले नाहीस . दुसरीकडूनच
कोठून तरी आणले आहेस . ' घोनू म्हणाला , ' खरं आहे तुझं . मी सामोसे हरीकडून
आणले नाहीत तर काळू उंदराकडून आणले .
कारण हरी
पोपट त्याच्या दुकानातच नव्हता . तो शेजारच्या दुकानात बसून गप्पा मारीत होता व मी
तो परत येईपर्यंत वाट पाहू शकत नव्हतो . ते ऐकून मिकू म्हणाला , ' हीच गोष्ट तर मी तुला समजावण्याचा
प्रयत्न करीत होतो .
अरे बाबा , तुही जेव्हा पाहावे तेव्हा
शेजारपाजारच्या दुकानांत जाऊन गप्पा मारत असतो . अशावेळी ग्राहक तुझी कितीवेळ वाट
पाहील . तेही तुझ्याप्रमाणेच शेजारच्या दुकानात जाऊन त्याला हवी ती वस्तू घेईल .
' माझ्या मित्रा , मला तुला हेच सांगायचे आहे की , तुझ्या दुकानात ग्राहक येवो वा न
येवो तू दकानात बसून राहा . आज ना उद्या तुझ्या दुकानातही टोनूच्या दुकानासारखीच
गर्दी होईल .
More Bodh Katha Moral Stories in Marathi
0 Comments